Friday 11 May 2012

ती . . . जिच्याविना सगळे अधुरेच



(माझी हि खालील कविता माझ्याकडून माझ्या देशासाठी आणि समाजासाठी एक सामाजिक कर्तव्य म्हणून लिहिलेली आहे खरेतर रविवार, दि. ० ६ / ०५ / २०१२ रोजी "आमीर खान" यांचा "सत्यमेव जयते" हा कार्यक्रम पाहिल्यानंतर आपणही आपल्या पद्धतीने काहीतरी करायला हवे ह्या प्रेरणेतून सगळे सुचले आहे, मी अशा करतो मी खालील कवितेत व्यक्त केलेल्या भावना तुम्हा सर्वांना आवडतील आणि त्यातून तो संदेश पुढे सरकत राहील . . . त्यामुळे जेवढे जमेल तेवढा हा संदेश पुढे पुढे पाठवा...)  

कवितेचे नाव :  ती . . . जिच्याविना सगळे अधुरेच

नाही चालणार हे जग,
ह्या जगाचा आधार तिचं,
चमत्कार हा देवाने केला,
ह्या विश्वाचा स्त्रोत तिचं . . . 

तिच्यामुळेच पूर्ण होतो,
तो राजा आणि तो रंक,
तिच्याविना सगळे अधुरेच,
काही मोजण्याइतकेच अंक . . . 

तिचं आई, तिचं मुलगी,
तिचं जीवनाची साथीदार,
जर संपली तिची उत्पती,
तर मिळेल का हो आधार . . . 

वंशाचा दिवा पेटण्यासाठी,
वातं तिचं असते,
दिवा पेटतो आणि प्रकाशमय होते सगळे,
पण ती वात तशीच जळत असते . . . 

इतके महत्व तिचे,
कोण समजेल का कधी,
मुलगी म्हणजे लक्ष्मी म्हणतो आपण,
तरी वाढ खुंटते तिचीच . . . 

सगळे मिळूनी आता,
ह्या जगास द्या एकाच नारा,
थांबवा मुलींची हत्या,
कारण तिच्याविना सगळा कोरडाच वारा . . . 
तिच्याविना सगळा कोरडाच वारा . . . 

- दीपक पारधे 


No comments:

Post a Comment