Tuesday 11 December 2012

पोलीस . . .



२६/११ ची आठवण,
अजूनही मनात जिवंत आहे,
आतंकवादयांशी लढता लढता,
पोलिसांचे रक्त सांडले आहे . . .

अश्या त्या भेडुक हल्याचा,
तो कट मोठा होता,
आतून पोखरलेल्या समाज्याचा,
एक गट त्यात होता . . .

मागून हल्ला करण्याची,
हि गनिमांची रीत जुनीच आहे,
असावध झोपलेल्या वाघांना मृत्यू,
आणि सावध मंत्र्यांना सुखद झोप आहे , , ,

तरीही त्यांना रोखण्यास,
आमचा पोलीस समर्थ होता,
कसाबला जिवंत पकडायला,
फक्त हवालदार ओंबळे होता . . .

पोलिसांच्या डोक्यावर जरी वाघ असला,
तरी हाताला दोरीचे बंध आहेत,
दोरी ताणून नाचवायला,
भ्रष्ट पुढारी आणि मंत्री आहेत . . .

अश्या त्या निडर पोलिसांना,
असते का स्वतःचे अस्तित्व,
मेल्यानंतर श्रद्धांजली देण्यापेक्षा,
त्याआधी सेल्युट करतंय माझं कवित्व . . .

- दीपक पारधे

Monday 12 November 2012

आली वर्षांची दिवाळी . . .



आली वर्षांची दिवाळी,
संगे लाडू - शंकरपाळी,
ढीग फराळ सजला,
उडे फटाक्यांच्या माळी,

दारी दिवे हे सजले,
तोरण - कंदील ते लागले,
सण असा चैतन्याचा,
घरी लक्ष्मीस पुजले,

मन आनंदी  बहरले,
नात्यांसह गहिवरले,
मित्र सोबती आप्तेष्ट,
चांदणे शिंपित ते  फिरले,

ऋतू असा बहरावा,
मने गुंफून ती यावी,
जरी छीद्राचीओंजळ  ओंजळ,
पण प्रेमाने वाहावी,

अशी सुखाची दिवाळी,
भरो समृद्धीची झोळी,
आलो शुभेच्या घेवून,
देत भल्या पहाटेची आरोळी
अशी आली वर्षाची दिवाळी

- दीपक पारधे 

(माझ्या तमाम श्रोत्यांना माझ्याकडून माझ्या कवितेच्या रुपात दिवाळीची भेट, हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुख - समृद्धी आणि भरभराटीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.... शुभ दीपावली)

Saturday 27 October 2012

आई - बाप . . .


काय व्यवहार हा केला,
जग पाठी सोडियला,
धन पैसा कमवूनी,
दोन नाती विसरला . . . 

ज्या हातात वाढला,
बाळ पाळण्यात निजला,
अंगाईविना झोप,
का कधी लागलीया तुला . . . 

एक छोटंसं खुराडं,
कशी व्हहिल रं तुझी वाढ,
ह्या चिंतेनं खचून,
पार खुटलं ते झाड . . .  

मोठं करुनीया तुला,
घास सोन्याचा भरविला,
थाटून संसार तुझा,
जो फाटक्या झोळीसः परतीला . . .

ह्यो आई - बापाचा त्याग,
कधी कळला का तुला,
लाख देव देव करून,
तू खऱ्या देवास मुकला . . . 

नको इसरूस त्यांना,
जे मेलं तुह्यासाठी,
आई - बापाच्याच रुपात,
असतो देव आपल्यापाठी . . . 

आई - बापाची हि माया,
त्या ढगाहुन ही मोठी,
काही शब्दात मांडीतो,
माहे भाव त्यांच्यासाठी . . .

आई - बापाचं हे नातं,
सर्व जगी मोठं बाळा,
त्यांच्या मायेविना सदा,
सुका राहील ह्यो झोळा . . . 
सुका राहील ह्यो झोळा . . .

- दीपक पारधे 

Thursday 4 October 2012

बंध . . .


भांडणांच्या गोष्टी . . .


परतीचा प्रवास . . .


जाड्या . . .


मेरा भारत महान !!!


सुख हास्य . . .



(हि कविता एका अश्या विषयावर केली आहे ज्याविना सगळ्यांचे जीवन अधुरेच असते आणि ते म्हणजे सुख . . . तुम्हीच विचार करा तुमच्याकडे पैसा आहे, खूप संपत्ती आहे पण जर सुख नाहीये तर त्या पैश्याचा आणि संपत्तीचा काही फायदा होईल का ? नाही ना... कारण खरच पैश्याने सर्व काही खरेदी करता येतेच असे नाही. सुख म्हणजे काय कधी कधी तर सुखाची व्याख्या हि कळत नाही, मला काही हाच प्रश्न पडलाय आणि त्यावरच विचार करून काहीतरी उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलाय, पहा तुम्हालाही सापडताय का यातून उत्तर . . .  मला नक्की सांगा तुम्हाला काय उमजले ह्यातून . . . धन्यवाद !!!  )

न मिळे हे त्यास,
खरे हवे  हे ज्यास,
व्याख्या हि मनाची,
व्याख्या हि सुखाची . . . 

मनास न कळती,
तरीही मनास हे बोचती,
टाकुनी सर्व मागे,
फक्त सुखाखातर भागती . . .

न पैश्याचे मौल ह्यास,
न धनाचे तौल ह्यास,
न मिळती हे बाजारात,
न लाभे हे वाण्यास . . . 

म्हणाले संत रामदास,
विचार तू मनास,
जगी न सुखी कोण,
शोधूनी ह्या जगास . . .

न तुलना ह्यास कशाची,
गोडी ह्यात मधाची,
घनदाट जंगलामधुनी,
मिळावी वाट सुखाची . . .

काय करावे मग,
प्रश्न करी मनास,
जोड फक्त माणूस,
पात्र होशील सुखास . . .

म्हणोनी झटकून हा व्देष,
म्हणोनी झटकून हा राग,
माणसास माणूस जोडूनी,
उमलावे सुख हास्य . . .
उमलावे सुख हास्य . . . 

- दीपक पारधे 

Monday 10 September 2012

आभाळीच्या पाखरा . . .



हे आभाळीच्या पाखरा, लय उंच तुझी झेप रं . . .
पावसाची सर येता, घराकडं खेप रं . . .
दाटलंया आभाळ, तू धाव जरा घे,
रानातूनी पळता, इसावा जरा घे,
हे मोडलंया घर तुझं, मनी भ्याव तुझ्या रे . . .
हे आभाळीच्या पाखरा, लय उंच तुझी झेप रं . . .
पावसाची सर येता, घराकडं खेप रं . . . 

दाटता आभाळ, माह्या उर कसा पेटला,
आठवणी पुरात गेल्या, संसार माह्या मोडला,
रानराण भटकत, वाघ शेळ्यात हा झोपला,
पडता कहर तुझा, पूर भिंतीतुनी नाचला,
कपाळाच्या नशिबाला, साथ तुझी दे . . . 
मोडक्या ह्या घराला, हाक तुझी दे . . .
हे उभा राहील संसार तुझा, दे छाप तुझी रे . . . 
हे आभाळीच्या पाखरा, लय उंच तुझी झेप रं . . .
पावसाची सर येता, घराकडं खेप रं . . .

मोडक्या घराला पाहता, ताठला ह्यो बाणा,
संसारासी उभा ठाकला, ताठ माह्या कणा,
पाऊस गेला सुकून परी, पाणी डोळ्यामंदी राहिलं,
थाटून संसार नवा, देवा फुल तुझं वाहिलं,
जात तुझी नांगराची, औत हाती घे . . .
करुनिया पेरणी, आलंय पिक नव हे . . .
हे सपान व्हत जुनं, आता पहाट मोठी रे . . . 
हे आभाळीच्या पाखरा, लय उंच तुझी झेप रं . . .
पावसाची सर येता, घराकडं खेप रं . . .

माय माझी धरणी, न बाप हा आभाळ,
उभारलंया समदं, जरी फाटकं कपाळ,
झेप घेतली पाखराची, न भुईस हा भार,
मोडक्यातून उभं राहिलं, देवा तुझाच आधार,
 करणी तशी भरणी, हि जाण मनी घे . . .
मोडलेल्या जगास, हाक तुझी दे . . .
हे जिद्दीच्या ह्या शिकवणीच, तू पाठ जगी दे . . .
हे आभाळीच्या पाखरा, लय उंच तुझी झेप रं . . .
पावसाची सर येता, घराकडं खेप रं . . .

- दीपक पारधे 

Friday 7 September 2012

अपेक्षांच्या सरी . . .




लिहतोय काहीतरी असे,
जे सगळ्यांच्या मनाला भिडेल,
मांडून मनाची व्यथा,
जो अर्थ सगळ्यांना पटेल . . .

कधी सुखाचा डोंगर,
तर कधी दुःखाची दरी,
पाणावलेल्या मनावर,
अपेक्षांच्या सरी . . . 

असा हा पाऊस अपेक्षांचा,
नेहमी दुसऱ्यालाच भिजवतो,
मोडताच कुठलीही अपेक्षा,
वाऱ्याविजांसह कडाडतो . . . 

हीच विजेची ठिणगी,
जेव्हा पडते नात्यांच्या झाडावर,
विखुरलेल्या मनांची व्यथा,
येवून संपते या झाडाच्या राखेवर . . .

असे का होते नात्यात,
जेव्हा बंध सहज तुटते,
शपथासह बांधलेल्या नात्याला,
एक ठिणगी येवून संपवते . . .

प्रश्न हा देखील मनाचाच,
मनासच विचारत आहे,
दिवसेंदिवस अपेक्षेपोटी,
नात्यांची गोडवी कमी होत आहे . . .

अशा अपेक्षांची आस,
मी केव्हाच सोडली आहे,
म्हणून माझ्या शब्दांच्या ओळीतून बहरलेली,
नाती मी जोडली आहे . . . 

तरीही त्रास होतो यांचा मला,
कारण प्रियजनांची अपेक्षा जिवंत आहे,
कितीही प्रयत्न केला दूर जाण्याचा तरी,
मनाच्या ह्या अनोख्या खेळत, मी सुद्धा भरडत आहे . . .  
मी सुद्धा भरडत आहे . . . 

- दीपक पारधे 

Wednesday 29 August 2012

असा "मी'' तसा "मी"...


असा "मी'' तसा "मी"
मान हृदयातला "मी"
स्वाभिमान सगळ्यांचा,
तोर्यात फडकतो "मी" . . .

ह्या प्रांतांचा "मी"
त्या देशाचा "मी"
भिन्न भिन्न लोकांच्या,
ओळखीचा चेहरा "मी" . . . 

एका पक्षाचा "मी"
दुसऱ्या संघटनेचा "मी" 
सगळ्या राजकारणात,
ठसा तयांचा उमटवितो असा "मी"

शिवबाचा "मी" 
औरंगजेबाचा "मी"
मराठी स्वराज्य राखतो,
भगव्यात रंगलो "मी" . . . 

भारताचा "मी"
सगळ्यांच्या शिरपेचात "मी"
तीन रंगांची ओळख,
अशोक चक्रासह "मी" . . .

जरी ह्यांचा "मी", जरी त्यांचा "मी"
माणसां - माणसात विखुरलेला, जातीपातीचा "मी"
मानाचा जरी होतो मुजरा मला,
तरीही एका दिवसाचा बादशहा "मी" . . . 

असा "मी" तसा "मी" 
नावाचा झेंडा "मी"
म्हणून स्वराज्याच्या तोरणावर,
सदा फडकतो "मी" . . .

- दीपक पारधे 

Friday 17 August 2012

तुटलेली मने . . .



मनांचे खेळ असतात चालू,
त्याला भावनांचा विळखा पडतो . . . 
तुटलेली मन जोडायला कधी,
का कुणाला वेळ असतो ?

भावनेच्या पलीकडे आणि मनाच्या आड,
सगळेच दडलेले असते,
काही प्रश्नपत्रीकांमध्येच 
उत्तर लपलेले असते . . . 

व्यथा होतात निर्माण मनात.
तेव्हा अगदी संताप येतो,
एखाद्या पुढाऱ्याच्या भाषणाला जणू,
बहिर्यांचा गोतावळा जमतो . . . 

मनात पडते दरी,
तेव्हा संपून जाते सगळे,
अविश्वासाचे सावट घेवून,
तळ्याकाठी जमतात बगळे . . . 

तुटू नये मन न यावे अपंगत्व,
म्हणून काय उपाय करावे,
अपेक्षांची घागर बुडवून,
प्रीतीचे दोन थेंब पाजावे . . . 

- दीपक पारधे   

Tuesday 24 July 2012

माझ्या प्रित पाखरा . . .





bol ip/tIce vahIle sagra,
k;el ka tuj, maZya ip/t paqra | | |

ip/t tuZyavr mazI jDlI,
p/ema.kurash fule ]mllI,
bhrun AalI v<9vLlI,
4e.b ip/tIce nwa AvtrlI,
mnI psrla 1tu bavra,
k;el ka tuj, maZya ip/t paqra | | |

pEltIravr we3 jahlI,
Abol natI gu.fu laglI,
qe; mnaca it4e ma.Dla,
wav mnatIl vahu lagla,
du:qavel mn ku`I Tyas Aavra,
k;el ka tuj, maZya ip/t paqra | | |

bol ip/tIce kanI Aale,
mnas mn he joDu lagle,
#a}k n Tyas hI ip/t inra;I,
qe; mnaca qo3I idva;I,
tu3le mn he Tya.sI savra,
k;el ka tuj, maZya ip/t paqra | | |

2Da 0kcI mna wavla,
ip/t n im;e TyasI jo wavuk jahla,
p` ja` hI tuj 0kda k;avI,
moh ip/t tuzI mla im;avI,
we3ayas tuz deh kaVhra,
k;el ka tuj, maZya ip/t paqra | | |

bol ip/tIce vahIle sagra,
k;el ka tuj, maZya ip/t paqra | | |

- dIpk par2e

Thursday 12 July 2012

'ती" . . .



माझ्या कवितेतली ''ती",
तिच्या ह्रुदयातला "मी",
प्रेमाच्या बंधनात गुंफलो,
माझ्या स्वप्नातली 'ती",

प्रितीचे बोल आज,
तिच्याकडून ऐकले,
शहारले मन,
जणू पाना - फुलांवर डोलले,

मिळताच इशारा तिचा,
सगळे ॠतु कसे बदलले,
लागताच चाहुल प्रेमाची,
मोर पिसारे मग फुलले,

न अजुनही मी तिस पाहिले,
न तिने मज पाहिले,
प्रेमाच्या शपथेसह,
हे मन तिस मी वाहिले,

रहावी प्रीति ही अशी,
जीवनास ती सोबती,
जरी प्रवास हा नवा जसा,
नवी प्रेमसंगती . . .  नवी प्रेमसंगती . . . 

- दीपक पारधे   

Tuesday 10 July 2012

मन प्रेम रंगी रंगले . . .



हे बंध कसे जुळले,
मनास मन हे भिडले,
प्रीतीत तुझ्या मी नाहलो,
मन प्रेम रंगी रंगले . . .

अनोळखी भेट जाहली,
मैत्रीची पालवी फुटली,
ह्या फांदीहून त्या फांदीवर,
फुलपाखरासह नाचली,
हे स्वप्न जसे पडले,
मन प्रेम रंगी रंगले . . .

सुखकर प्रवास जाहला,
मनास मन आवळला,
हृदयात भाव, ओठात बोल,
पण लगाम त्यांसी लागला,
भाव हे मनातच गोठले,
मन प्रेम रंगी रंगले . . .

आता न राहवे मनास,
सोबती हवी जीवनास,
प्रेमाध्याय मांडुनी तिच्यासमोर,
होकार मिळावा त्या प्रेमास,
पण उत्तर न मज मिळले,
मन प्रेम रंगी रंगले . . .

घेवून उडी सागरात,
रोखावा भाव प्रवास,
प्रेम न मिळे प्रत्येकास,
पण जीवास तिचाच ध्यास,
प्रेम प्रश्नरुपी उरले,
मन प्रेम रंगी रंगले . . .मन प्रेम रंगी रंगले . . .

- दीपक पारधे   

Wednesday 4 July 2012

कुणी आहे का माझ्यासाठी . . .



प्रेमाच्या ह्या दुनियेत, प्रत्येक तीरावर पाखरे दिसतात,
काहींकडे बघून हसू येते, तर काही माझ्याकडे बघून हसतात,
पण कुठेतरी मलाही वाटते की, माझही एक पाखरू असावं,
आणि जेव्हा असेल मी तिच्या खुशीत, तेव्हा तिने मला गोंजरावं,

कुठेतरी दूर आम्ही फिरायला जावं,
फिरून झाल्यावर कुठेतरी निवांत बसावं,
तिच्या गप्पांमध्ये मग हरवून जावं,
आणि एकटक फक्त तिच्याकडेच पाहावं,

माझ्या मनातील भावना, चटकन तिला कळावी,
तिच्या फक्त हसण्याने, एक सुंदर कळी फुलावी,
तिचे सौंदर्य पाहून, जशी चंद्राची चांदणीही लाजावी,
अशी लावण्यखणी माझ्या आयुष्यात यावी,

माझ्या प्रीतीचे पंख मग देईन मी तिला,
भावनांच्या विश्वात घेवून जाईन मी तिला,
प्रेमाच्या झुल्यावर झुलवीन मी तिला,
माझ्या प्रीतीची हवा मग घालीन मी तिला,

अशी कुणी मिळेल का मला प्रेमासाठी,
माझ्या हृदयाशी तार जोडण्यासाठी,
माझ्या वेड्या मनाला समजवण्यासाठी,
तिच्या प्रीतीचा आधार मला देण्यासाठी,
सांगा ना असे कुणी आहे का माझ्यासाठी . . . 
असे कुणी आहे का माझ्यासाठी . . . 

- दीपक पारधे 

Friday 29 June 2012

बोला पांडुरंग हरी . . .




विठ्ठल विठ्ठल गजर जाहला, अवघी दुमदुमली पंढरी,
हात कढेवर, उभा विटेवर असा शोभे माझा हरी . . .
बोला पांडुरंग हरी . . . बोला पांडुरंग हरी . . .

पंढरीच्या देवा तुझी कीर्ती मोठी ठावं रं,
बाळ गोपाळांसंगे नाचे रंक आणि रावं रं,
आलोया तुझ्या भेटीला, मुखात तुझं नावं रं,
प्रीतीच्या ह्या ओघात चाले, उठून सारा गावं रं,
दर्शनास आलो तुझ्या, जरी लांब ती पंढरी,
हात कढेवर, उभा विटेवर असा शोभे माझा हरी . . .
बोला पांडुरंग हरी . . . बोला पांडुरंग हरी . . .

ज्ञानोबा माउली संत माझा तुकाराम,
नावं तुझे घेता देवा, दिसे मज कृष्ण अन राम,
नामात तुझ्या वेड्या झालो, नसे मज काही काम,
वैकुंठाचे सुख मिळे मज, घेता मुखी तुझे नाम,
कर्माचा या भोग मिळतो, फक्त तुझ्याच दारी,
हात कढेवर, उभा विटेवर असा शोभे माझा हरी . . .
बोला पांडुरंग हरी . . . बोला पांडुरंग हरी . . .

आषाढीच्या दिवशी जमे भक्तांचा मेळावा,
दर्शनास तुझ्या येती, मनी मायेचा ओलावा,
वारकरी संप्रदाय, धर्म असा पहावा,
जात धर्म मिसळती हवेत, फक्त प्रीतीचा सांगावा,
जयघोष करीत असे निघालो, काळजी नाही बरी,
हात कढेवर, उभा विटेवर असा शोभे माझा हरी . . .
बोला पांडुरंग हरी . . . बोला पांडुरंग हरी . . .

चंद्रभागा वाहती अशी जणू प्रेमाचा ओढा,
आंघोळ करिता चंद्रभागेत, मिटे पापाचा घडा,
कर्माची हि रास लागती, माणुसकीचा पाढा,
लहान थोर पीत इथे, तुझ्या  प्रीतीचाच काढा,
मानवतेचा धडा मिळतो, देवा अशी तुझी वारी,
हात कढेवर, उभा विटेवर असा शोभे माझा हरी . . .
बोला पांडुरंग हरी . . . बोला पांडुरंग हरी . . .

माणुसकीचा नाश होतोय, पैशाच्या पोटी,
नाते सगळे वाहून जातात, जात यांची खोटी,
गोरगरीबांस सुख मिळो, हि एकची इच्छा माझी,
फक्त आशीर्वाद तुझा राहुदी, होईल कामना माझी पुरी,
हात कढेवर, उभा विटेवर असा शोभे माझा हरी . . .
बोला पांडुरंग हरी . . . बोला पांडुरंग हरी . . .

विठ्ठल विठ्ठल गजर जाहला, अवघी दुमदुमली पंढरी,
हात कढेवर, उभा विटेवर असा शोभे माझा हरी . . .
बोला पांडुरंग हरी . . . बोला पांडुरंग हरी . . . पांडुरंग हरी . . . 
पांडुरंग हरी . . . पांडुरंग हरी . . .पांडुरंग हरी . . .पांडुरंग हरी . . .
पांडुरंग हरी . . . पांडुरंग हरी . . .पांडुरंग हरी . . .पांडुरंग हरी . . .  

बोला पंढरीनाथ महाराज कि जय . . .  


- दीपक पारधे 

Sunday 24 June 2012

एक पहाट . . .



एक पहाट अशी व्हावी प्रत्येकाच्या आयुष्यात,
माणुसकीची बीजे उगावीत प्रत्येकाच्या मनात,
त्या पहाटेची किरणे फक्त सुख घेवून येतील,
अपेक्षांच्या डोंगरावरून प्रेम राग पसरवतील . . . 

स्वार्थाच्या ह्या दुनियेमध्ये माणुसकी हरवली,
बनावटी चेहऱ्यामागे जात अशी मिरवली,
अपेक्षांच्या कहर झाला, मने अशी हि तुटली,
स्वार्थहितासाठी वेड्या मनास, गाठ कशी हि पडली . . . 

जात - धर्म इथे धुळीत मिळाले, वैमनस्य मनी असे वाढले,
पैश्याच्या ह्या लालचे पोटी, नाते गोते विसरू लागले,
जाण न कुणा अशी राहिली, नितीमत्ता इथे संपली,
स्वार्थी अश्या वातावरणात ह्या, माणुसकीची वाढ खुंटली . . .

एकच इच्छा मनी आहे, व्हावी अशी पहाट,
मने फुलवून निर्माण व्हावी, माणुसकीची वाट,
माणूस धर्म असा पसरावा, जशी सागराची लाट,
वाहून जावी सगळीच दु:खे, वहावा फक्त सुखाचाच पाट . . . 
वहावा फक्त सुखाचाच पाट . . . 

- दीपक पारधे 

Friday 22 June 2012

मन . . .


मन . . .

काय असते मनात, कधी कधी कळतंच नाही,
चंचल मन एका फांदीवर, कधी बसतंच नाही,
कुठल्याही गोष्टीने समाधानी, ते कधी होतंच नाही,
अपेक्षांनी भरलेली घागर, कधी सुकी राहतच नाही.

असे हे मन . . . मित्रांनो हा माझा पहिलाच लेख आहे, आजवर मी माझ्या भावना फक्त कवितांमधुनच मांडत आलो, पण आज असे वाटते आहे कि, ज्या विषयावर मी लिहणार आहे, तो विषय चार पंक्तींमध्ये मांडता येणारच नाही. तर वरील चार ओळी वाचून आता पर्यंत तुम्हाला कळलेच असेल कि मी कुठल्या विषया संदर्भात बोलत आहे. तर तो विषय आहे " मन "

तुम्हाला वाटतं का हो, "मन" हा शब्द जितका छोटा आहे, तितकाच त्याचा गाभा पण छोटा आहे, नाही ना! . . .  असे कमीच लोक असतील ज्यांना असे वाटत असेल. मला वाटते आपण मन हे नावच छोटे ठेवले आहे, नाव कसे वजनदार, बहारदार, दमदार, काहीतरी भरीव असे असायला हवे होते, पण जेसे शेक्सपिअर साहेब म्हणाले कि " नावात काय आहे " त्याप्रमाणे आपणही ते सोडूनच पुढे बोलू. तर आपला विषय होता मन. मन म्हणजे आपल्या सोप्प्या भाषेत आपले हृदय  बरोबर ना!!!
पण परत एक गोष्ट खटकते, जर आपले शरीर आपल्या मेंदूने चालते तर मग जेव्हा मनाचा प्रश्न येतो, तेव्हा तो मेंदू हृदयात येवून बसतो का हो
काही लोकांच्या मते बसतही असेल आणि काही लोकांच्या मतेतर मेंदू आणि मन (हृदय) हे रावण आणि त्याचा भाऊ विभिषनासारखेच आहे, सिनेमात तर यावरून अनेक वाक्य प्रसिद्ध आहेत, जसे " में अपने दिमाग कि नहीं, हमेशा अपने दिल कि सुनता हुं ". . . पण ते राहिले सिनेमापुरतेच. पण मला असा प्रश्न पडतो कि, नेमके मन म्हणजे काय मेंदूमध्ये चाललेला गोंधळच ना! . . . माझे तरी हेच मत आहे, होय गोंधळच.   डॉक्टर, वकील, पोलीस ह्यांचा तर मनाशी सहसा संबंध येतंच नाही, त्यांच्या मेंदुवरच त्यांचे क्षेत्र आणि त्यांचे कार्य चालू असते आणि शिक्षक, लेखक - कवी, चित्रकार ह्यांचा जास्तीत जास्त संबंध मनाशी असतो, कारण त्यांची विचार करण्याची पद्धत तशी भावूक आहे.  पण जर पूर्ण शरीर एकाच गोष्टीने चालते, तर मग त्या गोष्टीला दोन विभिन्न नावे देवून वेगळं का करण्यात आले आहे
ह्यालाही आपण मनाचा अथवा मेंदूचा एक गोंधळच म्हणूया. 
कारण मन म्हणजे काही वेगळे अवयव नसून मेंदूच्या एका कोपऱ्यात चालू असलेला भावनांचा खेळ आणि त्या मेंदूचे कार्य अथवा त्या मनुष्याचे कार्य त्याच्या भावनांवर अवलंबून असते. तुम्हीच बघा ना, जर एखाद्या मुलाने चांगले वर्तन केले तर आपण लगेच कसे बोलतो कि, मुलाला चांगले संस्कार दिले आहेत, बरोबर ना, तसेच हे. म्हणजे जी लोकं अत्यंत भावनिक आहेत, ती लोकं मनाने निर्णय घेतात आणि जी लोकं कमी भावनिक अथवा कठोर व स्वार्थी वृत्तीचे आहेत, ते मेंदूने निर्णय घेतात.
यातून काढायचे तात्पर्य एवढेच कि आपले वर्तन आपण लावून घेतलेल्या सवईंवर अथवा विचारांवर अवलंबून असते. त्यात कुठल्याही प्रकारचे विभाजन नसते. प्रत्येकजनाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते आणि त्या वेगवेगळेपणा मुळेच माणसाची वेगवेगळी ओळख निर्माण होते. म्हणून मला नेहमी वाटते कि जर लहानपणापासूनच आपल्या मेंदूवर जर चांगल्या विचारांचा प्रहार झाला तरच आपण पुढे जावून संसारातील सगळी सुखे भोगू शकतो. अहो कित्येक लोकांना मी पाहतो, जे नेहमी दुसऱ्यावर कुरघोडी करणे, दुसऱ्याच्या कामात अडथळा निर्माण करणे यातच समाधानी मानतात. काहीजन तर स्वार्थामध्ये सामाजिक व कौटुंबिक सुखापासून देखील वंचित राहतात. त्यांना भानच नसते कि ते काय करत आहे, स्वार्थहितामध्ये ती लोक अगदी आंधळी होतात. अहो असे अनेक किस्से आपल्या आजूबाजूस घडतंच असतात. असाच माझ्या एका चांगला परीचयातला किस्सा मी तुम्हांस सांगू इच्छितो,
एक माझ्या चांगल्याच परिचयाचे नवरा बायकोचे जोडपे आहे, त्यांचा आणि माझा परिचय कसा हे सांगणे तितकेसे महत्वाचे नाहीये पण ते दोघेही माझ्या नेहमीच्या संपर्कातले म्हणून हि गोष्ट मला समजली.
तर गोष्ट अशी आहे कि, दोघांचाही हा दुसरा विवाह. दोघांनाही पहिल्या विवाहामधून मुले आहेत. पण आपणास आयुष्य जगण्यासाठी कोणीतरी साथीदार हवा, बहुतांश ह्याच विचारातून त्यांनी लग्न केली असावीत. पण सध्या स्तिथी अशी आहे कि, त्या दोघांचे एकमेकांबरोबर जराही पटत नाही आणि त्याचे कारण ही तितकेच गमतीदार आहे. ते असे, हे दोघे एक साथीदार असावा म्हणून एकत्र आले आणि आज त्यांचे एकमेकांकडून एवढ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत अथवा असे म्हणू कि स्वार्थ निर्माण झाला आहे. आज प्रत्येक गोष्टीवरून ते भांडत असतात तरीही ते एका स्वार्थी भावनेतूनच. कारण त्या व्यक्तीस त्याच्या निवृत्ती पर्यंत त्याचे घर सांभाळणारी स्त्री हवी आहे म्हणून आणि त्या स्त्रीला त्या व्यक्तीच्या निर्वृत्तीनंतर मिळणारा पैसा हवा आहे म्हणून, तर तुम्हीच सांगा, आज ह्याला आपण संसार म्हणू शकतो का? ज्या ठिकाणी एकमेकांसाठी प्रेम तर सोडा पण आपुलकीची भावना देखील नाहीये आणि ते तसे सुधारवण्याचा देखील प्रयत्न करत नाहीयेत, तर काय म्हणावे त्यांच्या मनाला.... 
तर मित्रांनो असे हे मन, कोण कधी काय विचार करेल, कोण कधी कसे वागेल ह्याचा काही नियम नाहीये. अहो, ह्या जगात असेही लोक आहेत जे स्वताचा विचार करण्या अगोदर नेहमी दुसऱ्याबद्दल विचार करतात. आणि हो, असे पहायला गेले तर दुसऱ्याला मिळवून दिलेल्या सुखात जो आनंद दडलेला असतो तो स्वतःला मिळालेल्या सुखातही नसतो आणि तोच खरा आनंद असतो. कारण आपण जन्माला येतो, त्यानंतर पुढचे आयुष्य घालवण्यासाठी आपल्याला आपल्यासाठी काही गोष्टी करणे भागच आहे, पण त्यातूनही वेळ काढून जर आपण कोणासाठी काही करू शकलो, तर ह्या जगात येवून आपण केलेले स्वर्वत मोठे कार्य तेच असेल आणि असे कार्य करायला आपण नेहमीच तत्पर राहिले पाहिजे. त्यालाच आपण जगणे असे बोलू शकतो.

मित्रांनो ह्या लेखामधून मला एवढेच स्पष्ट करायचे होते कि, आपले मन (मेंदू) जे आहे ते पाण्यासारखे आहे, ज्यात मिसळेल त्याला त्यांचा रंग व आकार येईल आणि त्या आकारावरच ठरेल कि तो मेंदू आहे के मन. 
त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या मनाला अथवा मेंदूला जितके ताब्यात ठेवू त्यावरच आपल्या वाट्याला सुख येईल आणि जर त्यावरचा ताबा सुटला तर वाट्याला फक्त वाद, तंटा, क्लेश, मनस्ताप ह्या सारख्याच गोष्टी येतील. तर आपणच ठरवले पाहिजे कि आपले जीवन कसे असावे सुखमय वा खडतर . . .  निर्णय शेवटी आपलाच.

धन्यवाद!!!

- दीपक पारधे