Friday 17 August 2012

तुटलेली मने . . .



मनांचे खेळ असतात चालू,
त्याला भावनांचा विळखा पडतो . . . 
तुटलेली मन जोडायला कधी,
का कुणाला वेळ असतो ?

भावनेच्या पलीकडे आणि मनाच्या आड,
सगळेच दडलेले असते,
काही प्रश्नपत्रीकांमध्येच 
उत्तर लपलेले असते . . . 

व्यथा होतात निर्माण मनात.
तेव्हा अगदी संताप येतो,
एखाद्या पुढाऱ्याच्या भाषणाला जणू,
बहिर्यांचा गोतावळा जमतो . . . 

मनात पडते दरी,
तेव्हा संपून जाते सगळे,
अविश्वासाचे सावट घेवून,
तळ्याकाठी जमतात बगळे . . . 

तुटू नये मन न यावे अपंगत्व,
म्हणून काय उपाय करावे,
अपेक्षांची घागर बुडवून,
प्रीतीचे दोन थेंब पाजावे . . . 

- दीपक पारधे   

No comments:

Post a Comment